अनुभव

कथाविभागात मंजू एहतेशाम यांची ‘छत्री’,
आणि स्वयंप्रकाश यांची ‘रशीदचा पायजमा’ या कथांचा विशेषत्वाने उल्लेख करावा
लागेल. याशिवाय, अनिल अवचट यांचा ‘कॅन्सर समजून घेताना’ आणि डॉ. भरत केळकर
यांचा ‘मी डॉक्टर, युद्धभूमीवरचा’ हे लेख विशेष वाचनीय झाले आहेत. विविध
विषयांना स्पर्श करणार्या लेखांमुळे वाचकांचे अनुभवविश्व समृद्ध होणार
आहे. ‘अनुभव’च्या या संग्राह्य दिवाळी अंकाची किंमत १२० रुपये आहे.
दीपोत्सव

हिंदुस्तान

स्वप्ना

रेवती जोशी-अंधारे
नागपूर
जागतिकीकरणाचे `रणांगण’
सध्याचे युग जागतिकीकरणाचे आहे, हे डोळ्या
समोर ठेवत डॉ. अविनाश गारगोटे संपादीत रणांगण या दिवाळी अंकात
जागतिकीकरणाच्या विविध पैलूंचा परामर्ष घेणारे अभ्यासपूर्ण लेख समाविष्ट
करण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने आदिनाथ हरवंदे यांचा `विश्वाचे आर्त
त्यांच्या मनी प्रकटले’, `उपचार आणि शुश्रुषा’, संतोष पाठारे यांचा `मराठी
सिनेमा जागतिक पटलावर’, मृदुला दाढे जोशी यांचा `आणि संगीताचा बदलता
चेहरा’, या लेखांचा प्रामुख्याने समावेश आहे. जातिकीकरण आणि त्याचे विविध
विषयांवरील परिणाम रणांगणातून मांडण्यात आले आहेत. या सोबतच चांगदेव काळे,
डॉ. सविता भावे, सदाशिव टेटविलकर, अरविंद भालेराव, गजानन म्हात्रे, अरविंद
बुधकर, संपदा वागळे, मिलिंद कल्याणकर, डॉ. अविनाश गारगोटे यांचे लेख, कथा
वाचनीय आहेत. या अंकातील `कविता-कविता’ आणि `गझल कट्टा’ यातील काव्यही
रणांगणाचे वैशिष्ट्य म्हणता येईल.
संपादक – डॉ. अरविंद गारगोटे, पाने – 192, किंमत – 151 रूपये
महानगरी वार्ताहर
`महानगरी वार्ताहर’च्या दिवाळी अंकात
साहित्याचा आगळा फराळ देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कथा, मुलाखत,
लेख, सिनेजगताची सफर, परिसंवाद, व्यंगचित्र, बालजगत, काव्यसुमने यांचा या
अंकात समावेश करण्यात आला आहे. विजया दीक्षित यांची युगांतर, सुप्रिया
अय्यर यांची प्रभावळ, बाळ राणे यांची अंधाराच्या दिशा या कथा या अंकात
आहेत. `कंटाळ्यावर उतारा’ ही अनुवादित कथा, कॅप्टन आनंद बोडस, ले.जनरल
दत्तात्रय शेकटकर, डॉ. प्रमोद पाठक, श्री. वा. नेर्लेकर यांचे लेख; मधु
पोतदार यांचा `लघुकथेवरील मराठी चित्रपट’ हा लेख वाचनीय आहे. परिसंवाद या
दालनात रमेश पतंगे, राधाकृष्ण नार्वेकर, अनिल डोंगरे, डॉ. संजय रत्नपारखी,
प्रा. डॉ. औचरमल एल. वाय., प्रा. किशोर काजळे आदी मान्यवरांचा समावेश आहे.
बाबू गंजेवार यांची व्यंगचित्रे मार्मिक झाली आहेत. बालजगतमध्ये लहान
मुलांसाठी वाचनीय साहित्य आहे. तसेच प्रा. पंढरीनाथ रेडकर, माधव गवाणकर,
अशोक भालेराव, डॉ. श्रीकांत नरुले, हेमंत डांगे, इंद्रनील तावडे यांच्या
कविता वाचकांना वेगळा अनुभव देतात.
संपादक – सतीश सिन्नरकर पाने – 210 किंमत – 150 रुपये
स्वप्ना
विविध क्षेत्रातील भ्रष्टाचाराच्या
प्रकरणांची सध्या जोरात चर्चा सुरू असताना `स्वप्ना’चा दिवाळी अंक हा
भ्रष्टाचार विशेषांक म्हणून काढण्यात आला आहे. हलकेफुलके साहित्य व
व्यंगचित्रांचा शिडकावा या अंकात करण्यात आला आहे. मेघा पाटकर, ऍड. उदय
वारुंजीकर, विवेक वेलणकर, प्रा. वैजनाथ महाजन, उत्तम कांबळे यांचे
भ्रष्टाचारावर विवेचन करणारे लेख; पंडीत हिंगे व खलील खान यांच्या कथा तसेच
डॉ. श्रीकांत नरुले, प्रा. नंदकुमार सुर्वे, गोविंद मोतलग, सु.रा.
देशपांडे यांच्या कवितांचा अंकात समावेश आहे. खलिल खान, प्रशांत आष्टीकर,
महादेव साने यांची व्यंगचित्रे खुसखुशीत झाली आहेत. अंकात `पानपुरके’मध्ये
वात्रटिका व विनोदांचा अंतर्भाव मनोरंजक ठरला आहे. अंकाचे मुखपृष्ठ
भ्रष्टाचार विशेषांकाला साजेसे झाले आहे.
संपादक – वि.द. बर्वे पाने – 306 किंमत – 100 रुपये
साहित्य मैफल
`साहित्य मैफल’च्या दिवाळी अंकात विशेष
लेख, ललित व आध्यात्मिक कथा, संस्था परिचय, यशोगाथा, कवितांचा समावेश आहे.
विष्णू परब यांचा विशेष लेख वाचनीय झाला आहे. बाळ राणे, अरुण डावखरे, सुधीर
सुखठणकर, डॉ. शुभांगी पारकर, अरुणकुमार यादव, गणेश पाटील, जयंत कोरगावकर,
देवीदास पोटे यांच्या कथाही मनाला भावणार्या झाल्या आहेत. संविता आश्रम व
अभिनव फाऊंडेशन या संस्थांचा विस्तृत परिचय या अंकात आपल्याला होतो.
प्रशांत असलेकर यांचा `उद्योजकांची यशोगाथा’ हा लेख आपल्याला उद्योगजगताची
माहिती देणारा आहे. कवितेचे दालन ह.शि. खरात, विद्या साठे, पुष्पा पोरे,
विजय शिंदे, वर्षा देसाई, भगवान निळे, प्रा. प्रतिभा सराफ यांच्या कवितांनी
सजले आहे.
संपादक – कुमार कदम पाने – 170 किंमत – 90 रुपये
चित्रलेखा
मराठीतील ‘चित्रलेखा’ या बहारदार मासिकाचा दिवाळी अंक हा खासमखास आहे. ‘चित्रलेखा लक्षवेधी’ या विशेष लेखांच्या मालिकेत ‘शंकराचार्याचे दिव्यदर्शन’ हा खास लेख आहे. हिंदू धर्मात शंकराचार्याचे स्थान मोठे आहे. त्यांचं धर्मातील स्थान कोणते? शंकराचार्य म्हणजे काय? त्यांची परंपरा कोणती आदींची माहिती या लेखात दिली आहे. शंकराचार्य पीठाची स्थापना करणारे आद्य शंकराचार्य इसवी सनाच्या ७८८ ते ८२० च्या दरम्यान होऊन गेले. त्यानंतर भारतात शंकराचार्याची परंपरा कायम आहे. भारताच्या सांस्कृतिक पर्यावरणात शंकराचार्यानी आपल्या नवविचारांनी चैतन्याची शिंपडण केली. सध्या अस्तित्वात असलेल्या शंकराचार्य पीठांमध्ये प्रमुख चारपीठं असली तरी स्वत:ला शंकराचार्य म्हणवणारे २० ते २२ शंकराचार्य आहेत. या पीठावर फक्त ब्राह्मण जातीतील पुरुषांची नियुक्ती केली जाते. सध्या शंकराचार्य ही राजकीय पक्षांची तळी उचलणारी सत्ता केंद्रे बनली आहेत. गुन्हेगारी, राजकारण, अनैतिकता इत्यादी बाबी उफाळून आल्याने ही सारी शंकराचार्य पीठं बदनाम झाली आहेत.
मराठीतील ‘चित्रलेखा’ या बहारदार मासिकाचा दिवाळी अंक हा खासमखास आहे. ‘चित्रलेखा लक्षवेधी’ या विशेष लेखांच्या मालिकेत ‘शंकराचार्याचे दिव्यदर्शन’ हा खास लेख आहे. हिंदू धर्मात शंकराचार्याचे स्थान मोठे आहे. त्यांचं धर्मातील स्थान कोणते? शंकराचार्य म्हणजे काय? त्यांची परंपरा कोणती आदींची माहिती या लेखात दिली आहे. शंकराचार्य पीठाची स्थापना करणारे आद्य शंकराचार्य इसवी सनाच्या ७८८ ते ८२० च्या दरम्यान होऊन गेले. त्यानंतर भारतात शंकराचार्याची परंपरा कायम आहे. भारताच्या सांस्कृतिक पर्यावरणात शंकराचार्यानी आपल्या नवविचारांनी चैतन्याची शिंपडण केली. सध्या अस्तित्वात असलेल्या शंकराचार्य पीठांमध्ये प्रमुख चारपीठं असली तरी स्वत:ला शंकराचार्य म्हणवणारे २० ते २२ शंकराचार्य आहेत. या पीठावर फक्त ब्राह्मण जातीतील पुरुषांची नियुक्ती केली जाते. सध्या शंकराचार्य ही राजकीय पक्षांची तळी उचलणारी सत्ता केंद्रे बनली आहेत. गुन्हेगारी, राजकारण, अनैतिकता इत्यादी बाबी उफाळून आल्याने ही सारी शंकराचार्य पीठं बदनाम झाली आहेत.
‘शहेनशहा अकबर’ या विशेष लेखात सम्राट
अकबराविषयी अभ्यासपूर्ण लेख आहे. आपल्या आयुष्यात ‘गाझी’ ते ‘धर्मनिरपेक्ष
सम्राट’ असा प्रवास त्याने साध्य केला. अकबर हा सर्व समाज हा ‘जगत्गुरू’
असे संबोधत असे. एवढे त्याचे राज्य न्यायी होते. अकबराच्या काळात युरोपातून
प्रवासी, धर्मगुरू, राजदूत आले. त्यांनीही अकबराच्या आठवणी लिहिल्या आहेत.
त्याने धर्मनिरपेक्ष, संघटित शिक्षण व्यवस्था उभारली, असे अभ्यासकांचे मत
आहे.
‘रंग-अभंग’ या पाच लेखांच्या मालिकेत
‘रेशीमगाठीत खूप काही जमलंय!’ ललित प्रभाकर, ‘अप्सराने माझ्यात निर्मिली
बदलांची प्रयोगशाळा’-डॉ. माधुरी सावंत, उद्योगपती सतीश चव्हाण यांच्यावरील
‘१२ वर्षात माझी वार्षिक उलाढाल ० ते ३०० कोटी’, ‘लावणी कला संघर्ष
बावनकशी’ वर्षा संगमनेकर, ‘माझा प्रवास सत्यशोधकी’ डॉ. श्रीराम गुंदेकर,
‘कलाकारीनं घुमवलं नाव बनवलं’ ख्वाजा सय्यद आदींची माहिती आहे.
‘डाएट आणि फिटनेस’, ‘जय जाधव यांची ऑनलाइन हास्यचित्रे, तंत्रज्ञानाची दिवाळी, दिव्यांचा रेकॉर्ड आदी सदरेही आहेत.
संपादक : ज्ञानेश महाराव
पाने : ११४
किंमत : ५० रुपये
पाने : ११४
किंमत : ५० रुपये

कालनिर्णयचा दिवाळी अंक हा भरगच्च विविधांगी मजकुराने रंगलेला आहे. ‘ओम नमो शिवाय काही नाही’ या रघुवीर कुल यांच्या लेखात देशातील जाहिरात विश्वाची मानसिकता रेखाटली आहे. भारतात काहीही विकायचं असलं तरी धर्माचा आधार घ्यावा लागतो. देशात आधुनिक शिक्षण सुरू झाल्यानंतरही धार्मिकता वाढतच आहे. कुंभमेळयात आंघोळ करणा-या आठ कोटी माणसांसाठी लाइफबॉय आणि टाटा स्वच्छ साबणाची जाहिरात करण्याची संधी १२ वर्षात येणार नव्हती. अनेक मोबाइल कंपन्यांनी हनुमान चालिसाच्या पोथ्याही वाटल्या. मॅकडोनाल्ड या जगविख्यात बर्गर चेनला भारतात येण्यापूर्वी बीफ पूर्णपणे काढून टाकावे लागले. शाकाहारीसाठी हिरवा तर मांसाहारीसाठी ब्राऊन ठिपका छापावा लागतो. ‘देवो के देव महादेव’ ही मालिका आबालवृद्धांना वेड लावणारी ठरली. हॅँडसम ‘शिव’ घराघरांत पोहोचला. ‘परिवर्तनाची पंचसूत्री’ या संदीप वासलेकर यांच्या लेखात देशातील परिस्थिती न बदलण्यावर भाष्य केले आहे. अनेक योजना, धोरणे राबवूनही भारतात फरक पडलेला नाही. आपण सर्वागीण विकासाबाबत विचारच करत नाही. देशात बदल घडवायचा असल्यास परिवर्तन घडवणे आवश्यक आहे. आर्थिक, सामाजिक, राजकीय, मानसिक स्तरावर बदल घडला पाहिजे. आतापर्यंत आर्थिक उन्नती झाली तरीही ‘काही तुपाशी बाकी उपाशी’ अशी परिस्थिती आहे. हा बदल सर्वसमावेशक नसल्याने समाजात तुपाशिवाल्यांची संख्या वाढली आहे. पण उपाशींचीही संख्या वाढली आहे. राज्यात ४४ हजार खेडी असून ३३ हजार खेड्यांमध्ये शाळा नाही. आइसलॅँडसारख्या छोटय़ा देशात २०० लोकसंख्या असलेल्या गावांत सर्वसोयी असलेल्या शाळा आहेत. त्यासाठी भारताने सैद्धांतिक चौकट, नेते-नागरिक संबंध सहकाराचे, घटनात्मक किंवा राष्ट्रीय संस्था, राष्ट्राची ओळख आणि सुरक्षा, धोरणं आदींकडे लक्ष द्यायला हवे. ‘भ्रष्टाचाराची मूलतत्त्वे’ हा निळू दामले यांचा लेख, ‘वैचारिक संघटना आणि आपल्याकडील विचार ‘खंत’ हा डॉ. चंद्रहास देशपांडे यांचा लेख विचार करणारा आहे. ‘प्लेबॉय’ या लैंगिकतेविषयी मासिकाची माहिती देणारा विशेष लेख या दिवाळी अंकात आहे. मानवी संवेदनांची भूक भागवणारी इतर माध्यमे नव्हती त्या काळात मासिकाने एक व्यासपीठ तयार केले होते. या मासिकामुळे समाजात अनेक बदल झाले. लैंगिकतेबाबत मोकळेपणा आला, हे विसरता येणार नाही. ‘नवी गाणी नवा साज’ या लेखात सध्याच्या काळात धुमाकूळ घालणा-या गाण्यांचा काळ आला आहे. मुकुंद कुळे यांनी नवीन गाण्यांची माहिती त्यात रेखाटली आहे. ‘उदयाचा मराठी सिनेमा’, ‘बदलता रशिया’, ‘अन्यायाचे परिमार्जन’ आदी लेख विशेष आहेत. तसेच दाजीपूरची अरण्ययात्रा, धक्कथा, कविता, व्यंगचित्रे आदींनी हा अंक भरगच्च झाला आहे.
संपादक : जयराज साळगांवकर
पाने : २३२
किंमत : १०० रुपये
पाने : २३२
किंमत : १०० रुपये

भारताने मंगळावर यशस्वी स्वारी केल्यापासून सर्व भारतीयांची छाती अभिमानाने फुलून आली आहे. अंतराळ संशोधन हे क्षेत्रही करिअरसाठी किशोर-युवावयीने पिढीला खुणावू लागले आहे. किशोरवयीन मुलांमध्ये तर एकूणच या क्षेत्राविषयी अपार कुतूहल आहे. हे कुतूहल, जिज्ञासूंचे शंकासमाधान करील असे डॉ. बाळ फोंडके आणि मोहन आपटे यांचे विशेष लेख हे ‘वयम’च्या यंदाच्या दिवाळी अंकाचे खास वैशिष्टय़ म्हणावे लागेल. अत्यंत देखणी सजावट, टाइप, कागद ही देखील वयमची खासियत म्हणावी लागेल. ‘यल्लो’ चित्रपटातील गौरी गाडगीळ, अभिनेत्री केतकी माटेगावकर आणि हत्तींशी संवाद साधणारे आनंद शिंदे यांच्या मुलाखतींमधून मुलांना प्रेरक असे खचितच गवसू शकते. अभिनेत्री स्पृहा जोशी, मृणाल कुलकर्णी, मुकुंद टाकसाळे, सुबोध जावडेकर, राजीव तांबे, डॉ. आनंद जोशी, मंजुश्री गोखले यांचे कथा-लेख याचबरोबर एक वर्षभर सुट्टी अनुभवणा-या आणि त्यातून बरेच काही गवसलेल्या हर्षवर्धन गोखले या मुलाचे वेगळेच अनुभवकथन यांचा विशेष उल्लेख करावा लागेल. सतत मुलांमध्ये वावरणा-या मोठय़ांना मुलांकडून काय मिळते याविषयीचा देणे मुलांचा हा विभागही वेगळा आणि वाचनीय आहे. ‘देशोदेशींच्या शाळा’ या विभागात परदेशांतील शाळांचे गुणविशेष वाचायला मिळतील. मुलांसह मोठय़ांनीही वाचावा असा हा अंक आहे.
मुख्य संपादक : शुभदा चौकर
पृष्ठे : १६४
मूल्य : ९० रुपये
पृष्ठे : १६४
मूल्य : ९० रुपये

गेली अनेक वर्षे वाचक आणि पुस्तके यांच्यातील स्नेहदुवा बनून गेलेल्या ‘ग्रंथाली’च्या ‘रुची’ दिवाळी अंकाबद्दल असलेली उत्सुकता यंदाच्या अंकातील विविधांगी विषयांमुळे पूर्ण होते. इंटरनेट, सोशल नेटवर्किंग, आपलं ‘सर्च’ लाइफ, आकाशवाणी याबद्दलचे विशेष लेख विभाग अंकाचे वैशिष्टय़ म्हणता येईल. याशिवाय, िलगबदल, विदूषक, लावणीसम्राट ज्ञानोबा उत्पात, चाचा चौधरीवाले व्यंगचित्रकार प्राण, वंशाचा दिवा हवा या सामाजिक मानसिकतेचे संभाव्य गंभीर परिणाम याविषयीचा लेख असे साहित्य उल्लेखनीय आहे. डॉ. दाऊद दळवी, प्रवीण बर्दापूरकर, नीला अशोक कोर्डे, रविप्रकाश कुलकर्णी, डॉ. अनंत लाभसेटवार, प्रभाकर भिडे यांचे लेख आणि कथाविभाग यामुळे अंकाच्या वाचनियतेत भर पडली आहे. कवितेची पानेही लक्षवेधक आहेत.
संपादक : अरुण जोशी
पृष्ठे : २३०
मूल्य : १०० रुपये
पृष्ठे : २३०
मूल्य : १०० रुपये

आधुनिक महिलांना डोळय़ासमोर ठेवून ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनी सुरू केलेल्या या मासिकाचा हा पाचवा दिवाळी अंक आहे. महिलांना करिअर आणि घरसंसाराबाबत मार्गदर्शन तर आहेच पण आरोग्य, नातेसंबंध या सामाजिक तसेच अर्थकारणाविषयी, लोकसंस्कृती असे विविधांगी लेख आहेत. मात्र, विषयांमधील तोचतोचपणा आणि टिपिकल महिलांचे विषय या पलीकडे जाऊन नवीन प्रयोग यात केले गेलेले नाहीत. नियमित अंक आणि दिवाळी अंकात काही फरक जाणवत नाही.
संपादक : हेमा मालिनी
पाने : २१०
किंमत : ५० रुपये
पाने : २१०
किंमत : ५० रुपये